E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाल पुस्तक जत्रा राज्यभरात व्हावी : सामंत
Wrutuja pandharpure
23 May 2025
पुणे
: मुलांना वाचनाची गोडी लावणारी बाल पुस्तक जत्रा ही पुण्यापुरती राहता कामा नये, तर तिचा प्रसार राज्यभरात व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाल पुस्तक जत्रेचे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनाप्रसंगी उदय सामंत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, महापालिकेचे अधिकारी सुनील बल्लाळ, राजेश कामठे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, बुलढाणा अर्बन को क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, ज्येष्ठ चित्रकार ल. म. कडू, बालसाहित्यकार राजीव तांबे, संवाद पुणेचे सुनील महाजन, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या स्मृतिपित्त उभारलेल्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात प्रकाशकांची साधारण ७० पुस्तकांची दालने असून, त्यात बालसाहित्याला वाहिलेल्या दालनांचा समवेश आहे.
मिसाळ म्हणाल्या, पुस्तक हातात घेऊन, वाचण्याची गंमत लॅपटॉप किंवा संगणकावर वाचून मिळत नाही. त्यामुळे मुलांनी वाचण्यासोबतच पारंपारिक भारतीय खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा.पांडे म्हणाले, पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे येत्या रविवारपर्यंत पुणे पुस्तक बाल जत्रेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणे राज्यात नागपूर आणि आणखी काही शहरात पुस्तक महोत्सव होणार असल्याचे मिलिंद मराठे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले.सामंत म्हणाले, पूर्वीची लहान मुले आणि आताची लहान मुले यांच्यातील फरक स्पष्ट जाणवतो. पूर्वीच्या मुलांना आजार होत नाही, तर आताच्या मुलांची प्रकृती फार लवकर बिघडते. पुस्तकांची जत्रा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, त्याला जोड भारतीय पारंपरिक खेळांची दिल्याने मुलांसोबतच पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
Related
Articles
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात